Monday, December 23, 2013

प्रिय नेल्सन मंडेला


















तुम्ही दवाखान्यात मृत्यूशी झुंजत असताना हे पत्र लिहिलं होतं. भारत सरकारने तुम्हाला १९९० मध्ये भारतरत्न किताब दिला तेव्हा तुम्ही भारतात आला होतात. त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो. दूरदर्शनवर, वर्तमानपत्रात फोटोत पाहिलेलं तुमचं व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभं राहतंय. वेगवेगळ्या रंगांच्या फुल्या, नक्शी असलेला फूल बाह्यांचा शर्ट, खिशाला दोन पेन अडकवलेले, बोलके डोळे, पांढरे कुरळे केस, मागे वळण दिलेले. चेहरा काळा, रापलेला, हसरा. हुबेहूब महात्मा गांधी जसं हसायचे तसं तुम्ही हसता आहात असं जाणवून गेलं होत. पुढे अनेकदा दूरदर्शनवर तुमचा दर्शन झालं की जाणवायचं कला माणूस किति सुंदर असतो. 

गांधीचा आणि तुमचा संबंध काही हास्यातले साम्यापुरता नव्हता. दक्षिण अफ्रिकेत तुम्ही गांधीजींची सामाजिक न्यायाची वंशभेदविरोधी लढाई पुडे नेली. तिचे वारस झालात. ती लढाई जिंकून दाखवलीत. द. आफ्रिकेला खंर स्वातंत्र्य मिळवून दिलंत. तिथला वंशभेद गाडला. गरिबी मिटवण्यासाठी प्रयत्न केले. काळे व गोरे यांत समन्वयाची भूमिका रुजवली.

तुमचं सारं जगणं पाहिलं की कुणीही अचंबीत व्हावं असं आहे. १८ जुलै १९१८ रोजी द. आफ्रिकेतल्या मावेधा या गावी थिंबू कुटुंबात तुम्ही जन्मलात. थिंबूहे एक प्राचीन कृष्णवर्णिय जमातीचं नाव. तूमचं लहानपणीचं नाव झोसा. त्याचा अर्थ होतो, अडचण निर्माण करणारा. पण तुम्ही आयुष्यभर अडचणी असणाऱ्यांना मदत केली. नंतर तुमच्या गोत्रावरून तूमचं नाव मदिबा पडलं. प्रेमाने आजही तुम्हाला द. आफ्रिकेत नागरिक याच नावानं संबोधतात. तुमचे खापर पंजोबा थिंबू टोळीचे प्रमुख होते. केप प्रांतात या टोळीतले लोक राहतात. या खापर पंजोबाच्या एका मुलाचं नाव मंडेला होतं. त्या मंडेलांशी तुमचं नातं; तुमच्याही आडनावात मंडेला नाव आलं. 

तुमच्या कुटुंबात कुणी शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. आधी तुम्ही शिकलात. पुढे वकील झालात. जोहान्सबर्गमध्ये राहत असताना तुम्ही वसाहतवाद विरोधी आंदोलनात सहभागी झालात. त्यावेळी भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. अफ्रिकन नॉशनल काँग्रेसच्या झेण्ड्याखाली तुमचा स्वातंत्र्य लढा सुरु होता. या पक्षाच्या यावक आघाडीचे सदस्य म्हणून काम सुरु केलं आणि हळूहळू तुम्ही नेते बनलात. 

चळवळीत तुमच्यावर कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा पगडा बसला. महात्मा गांधी यांचे विचारही तुम्हाला पटले. मार्क्स आणि गांधी या दोघांच्या विचारांचा समन्वय करत तुम्ही लढत राहिलात.

वसाहतवादी ब्रिटीश गोरयान्च तुमच्या देशावर वर्चस्व होतं. हे गोरे लोक व द. अफ्रिकन नागरिकांना लोकशाही हक्क नाकारत होते. रंगावरून भेद करत होते. कृष्णवर्णीयांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना सन्मानानं जगता यावं हा तुमचा आणि सहकाऱयांचा अट्टाहास होता.

1962 साली तुम्हाला वसाहतवाद विरोधी आंदोलनात अटक झाली. जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर 27 वर्षे तुम्ही तुरुंगात होतात. हालअपेष्टा भोगून तुम्ही तुरुंगातून स्वातंत्र्याची लढाई लढलात. तुमच्या सुटकेसाठी जगभरातून दबाव आला. मग कुठे वसाहतवादी गोरे नमले. 1990 साली तुमची सुटका झाली. तुरुंगानं तुम्हाला नवा जन्म दिला. उजळून टाकलं. तुम्ही बाहेर येताच दक्षिण अफ्रिकेचे नेते बनलात. सवर् पक्ष तुमच्या भोवती उभे राहिले. तुम्ही आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झालात. त्याच काळात तुमचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. तुमचे तुरुंगातले दिवस आणि चिंतन जगभराच्या लोकांनी अधाश्यासारखं वाचून काढलं.

त्यावेळी द. आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डब्ल्यू क्लकर् हे गोरे होते. त्यांच्याशी तुमच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या. 1994 साली नव्याने निवडणुका झाल्या. या निवडणुकांत पहिल्यांदा कृष्णवणीर्य नागरिकांना मतदान करता आले. तुम्ही प्रचंड मतांनी जिंकलात. त्यानंतरच्या राष्ट्रीय संकटात तुम्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष झालात. 10 मे 1994 ते 14 जून 1999 अशी पाच वर्षे तुम्ही कारभार केलात. 

पाच वर्षाच्या काळात तुम्ही द. आफ्रिकेचा स्वप्नवत कायापालट केला. नवी राज्यघटना लागू केली. सत्य आणि समन्वय हे तुमच्या कारभाराचं सूत्र होतं. जमीन सुधारणेचा महत्त्वाचा क्रांतिकारक कार्यक्रम तुम्ही राबवला. गरिबीविरुद्ध युद्ध पुकारलंत. प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा ही तुमची घोषणा गाजली. त्याचा खेडोपाडी नागरिकांना लाभ मिळाला. जगभरात तुमच्या कार्यामुळे तुम्ही मान्यता पावलात. पाच वर्षांची कारकीर्द संपल्यानंतर दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यास तुम्ही नकार दिला. नव्या लोकांना संधी दिली. सत्तेच्या मायाजालाला नकार देणं हे मोजक्या मोठ्यांना जमतं. सारे मोठे नेते या मार्गाने जात नाहीत. या बाबतीतही तुम्ही गांधीजींचे वारस ठरलात.

तुम्ही 1999 नंतर राजकारणातून निवृत्ती घेतलीत. सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वयंसेवी संस्था काढून काम सुरु केलं. गिरीब निर्मूलनासाठी प्रयत्न सुरु ठेवलेत. आरोग्य सेवा लोकांपर्यंत नेण्याचा खटाटोप केला. 1983 साली तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळाला. रशियाने तुम्हाला आॅर्डर आॅफ लेनीन हा किताब दिला. द. आफ्रिकेने तुम्हाला राष्ट्रपिता हा किताब देऊन तुमचं ऋण मान्य केलं. तुम्हाला जगभरातले एकूण अडीचशे पुरस्कार मिळाले. महात्मा गांधी गेल्यानंतर त्यांचा अंश आपल्या आहे हे समाधान तुमच्याकडे बघून मिळायचे. द. आफ्रिकेचा पहिला काळा अध्यक्ष झाल्यावर तुम्ही म्हणालात मी लोकशाही समाजवादी आहे. तेव्हा भांडवली जगाने चमकून बघितलं कुणी कुत्सितपणे हसलं, कारण तो काळ जागतिकीकरणाच्या आरंभाचा होता. साम्यवादी रशिया कोसळला होता, समाजवादी देशांची पीछेहाट झालेली होती, क्युबा आणि फिडेल कॅस्ट्रो दोघेही थकले होते. चीनने वेगळी वाट निवडली होती.

गांधीजींच्या भारतात शायनिंग इंडियाचे वारे जोरात होते. अमेरिकेकडे आणि तिथल्या भांडवलाकडे, त्या भांडवलाच्या नियंत्रणकर्त्यांच्या इशाऱयाकडे भारतीय राजकर्त्यांचे डोळे लागले होते. त्या इशाऱ्यावर इथली  अर्थव्यवस्था विकासाकडे हलत होती. अशा वेळी तुम्ही समाजवादाचा नारा देणं, समाजवादी जग शक्य आहे असं म्हणणं मोठे धाडसाचं होते.

तुम्ही धाडस दाखवलंत. कारण हरणं तुम्चाय सारख्यांना मान्य होणारच नाही. जगभरचे गरीब जिंकले पाहिजेत हाच तुमच्या लढाईचा गाभा होता. तुम्ही मार्क्स स्वीकारलात पण पोथी नाकारलीत. मार्क्सचा विचार दररोज नवा होत असतो. पोथी शिळी होत जाते हे तुम्ही दाखवून दिलंत. सक्रिय असेपर्यंत तुम्ही गांधींसारखेच एकटे पडला नाहीत. कंपू, डबके करुन राहिला नाही, वावरला नाहीत. जनप्रवाहाच्या मध्यभागी तुम्ही आणि लोक तुमच्या भोवती राहिले. लॉंग वॉक टू फ्रिडम आणि प्रेसिडेन्शीयल इयर्स ही तुमची दोन पुस्तकं गाजली. या दोन्ही पुस्तकांत तुम्ही जे जगलात आणि जसा विचार केला तसं चिंतन, जीवनानुभव तुम्ही मांडला. तुमचं नव्या जगाचं स्वप्न या पुस्तकामध्ये आलंय. नवा माणूस घडविण्यासाठी तुमचे प्रयत्न त्यात मांडलेत.

निर्भय जगावं कसं हे तुमच्यासारख्या माणसांकडून शिकावं. 27 वर्षे तुरुंगवास म्हणजे साधासुधा काळ नव्हे. या काळात तुम्ही द. अफ्रिकन माणसाच्या मुक्तीचा विचार जिवंत ठेवलात. तुरुंगातून अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा दिलीत.

तुमचं प्रत्यक्ष जीवन म्हणजे समाजवादी विचाराची एक कृतीच. तुमचा साधेपणा, काम करणं, कार्यकर्त्याशी असणारा सद्भाव याला तोड नाही. तुम्ही कौटुंबिक जीवनही समृद्ध जगलात. तीन पत्नी व तीन अपत्य. त्या प्रत्येकाला तुम्ही न्याय दिला. तुम्ही तीन लग्न केलीत, निभावलीत. आमच्या देशात हे ऐकून  लोक नाकं मुरडतील, पण तुमच्या समाजात ती प्रथा आहे. शिवाय तिन्ही पत्नींना तुम्ही बरोबरीनं वागवलंत. त्यांच्या व्यक्तिविकासाला पूरक ठरलात. दुसाऱ्या पत्नी विनी मंडेला यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गैरवर्तणुकीचे आरोप झाले, तुम्ही नीतिमान वागणं, भ्रष्ट न होण्याच्या बाजूचे कट्टर समर्थक. तरीही विनी मंडेला जोपर्यंत भ्रष्टाचारी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी तिच्या बाजूला अशी भूमिका तु्म्ही घेतलीत. त्या भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध झाले आणि तुम्ही विनींचा पाठिंबा काढून घेतला. 

आता जगभर तुमच्यासारखी माणसं कमी राहिली आहेत. मार्क्स, गांधी, लेनीन यांच्या परंपरेतले तुम्ही आमच्यासाठी कायम प्रेरक शक्ती म्हणून वावरलात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लढणाऱया माणसाला तुम्ही आधार वाटत आलात.

तुम्ही दिलेला लढाईचा वारसा सर्व काळी, सावळी, गोरी मुलं अभिमानानं मिरवतील असा आहे.

jepee keÀeboUkeÀj
rajak2008@gmail.com

Tuesday, October 15, 2013

डॉक्टर, तुम्ही म्हणालात, नुसतं लिहू नको!













डॉक्टर, तुमच्या संबंधीची भयंकर बातमी कळाली. एसएमस येत गेले. आमदार कपिल पाटील यांचा फोन आला. खात्री झाली. भोवती भूकंप होत आहे असं जाणवलं. कपिल पाटील, संभाजी भगत, येशू पाटील, जयवंत पाटील यांच्या सोबत साताऱ्याला तुमच्याकडे निघालो. मनात तुच्यासंबंधीच्या आठवणी, विचार घोंघावत होते. तुमची साधनाच्या कार्यालयातली भेट टक्क समोर उभी राहिली. तुम्ही साधना मिडिया सेंटरच्या वरच्या मजल्यावरच्या साधनाच्या ऑफिसमध्ये बसला होता. समोर प्रा. ग. प्र. प्रधान सर होते. बाजूला प्रा. रा. ग. जाधव सर होते. तुम्ही म्हणालात, ये.... ये.... बस... अगोदर जुजबी भेटलो होतो. त्या भेटीत तुम्हाला कळलं होतं, हा जर्न्यालिझमचा अभ्यासक्रम रानडे इन्स्टिटयूटमध्ये शिकतोय, काही बाही इकडे तिकडे लिहितोय. तुम्ही प्रधान सर, जाधव सरांना म्हणालात, हा राजा कांदळकर. संगमनेरचा आहे. चांगलं लिहितो बर का? शिवाय वाचतो चांगलं. चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये फिरतो.अरे व्वा! चांगलं आहे, प्रधान सर म्हणाले होते तेव्हा.
तुमची ही खास पध्दत असावी. तरूण मुलाला आत्मविश्वास देण्याची. खरं म्हणजे मी काही तेव्हा फार लिहिलं नव्हतं. चळवळीतल्या लोकांमध्ये चाचपडत होतो. तरी तुम्ही मला चांगलं लिहितो असं म्हणालात. आज त्याच महत्व कळतयं. डॉक्टर या तुमच्या त्या शाबासकीच्या थापेनं खूप आत्मविश्वास दिला होता. त्या भेटीनंतर तुम्ही मला साधना परिवारात घेतलं. येत जा, म्हणालात. भेटलात की विचारायचा, काय विषय डोक्यात  आहे!

एकदा म्हणालात, गोसी खूर्द परिसरात प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे. जातोस का तिकडे? विदर्भात आहे. नागपूरला जा. सुभाष लोमटे, विलास भोंगाडे यांचा त्यात पुढाकार आहे. त्यांच्याशी संपर्क कर. ग्राऊंड रिपोर्ट साधनासाठी लिही. तुम्ही माझ्या मागेच लागलात. संंबंधितांचे फोन दिले. मला पाठवलं गोसी खुर्दला. आंदोलनाचा रिपोर्ट साधनात छापला. पुढे भेटल्यावर सगळयांना सांगत सुटलात याने गोसी खुर्दचा रिपोर्ट फार चांगला लिहिला.

तुम्ही हे करत होतात त्यातून मला किती उर्जा मिळत होती. म्हणून सांगू डॉक्टर! तुम्हाला माझ्याबददल सगळं माहित होतं.... हा मुलगा खेडयातला आहे. शेतकरी घरातला आहे. पुण्यात शिककतोय पण गांगारलेला आहे. शेतकरी घरातला आहे. याच्या मनात गोंधळ आहे. पुढे कसं जावं, काय करावं हे याला स्पष्ट नाही... घरात वाचनाची लिहिण्याची परंपरा नाही. विचार करण्याची परंपरा नाही... अनेक दोष आहेत... मलाही ते जाणवत होतं. पण तुम्ही कधी त्या दोषांबददल बोलला नाहीत. सतत पुढे ढकलायचा प्रयत्न करत होतात.

त्यावेळी साधना साप्ताहिकात तुम्ही अनेक प्रयोग करत होतात. युवा संपादक निवडून त्यांच्यामार्फत काही विषयांवर अंक काढावेत ही तुमची कल्पना होती. माझ्यासारखेच तुमच्याकडे मंजिरी घाटपांडे, प्रसाद मणेरीकर हे यत असत. तुम्ही एकदा तिघांना एकत्र बसवून म्हणालात तुम्ही तिघं युवा संपादक व्हा. काही अंक संपादीत करा. वेगवेगळे नवे विषय त्यात आणा. काही जणांना लिहायला सांगा. आम्ही तिघांनी काही अंकांचं संपादन केलंही. त्याचं तुम्ही भरपूर कौतुक केलं. दोष मात्र उगाळत बसला नाहीत.

असंच एकदा तुम्ही म्हणालात आजचे युवक काय विचार करतात. त्यांची जीवनशैली कशी आहे. याबददल तुम्ही एक विशेषांक काढा. तेव्हा विनोद शिरसाठ आणि मी तुमच्याकडे येत होतो. सारीका शिंदे कधी कधी यायची.  तिघांवर  तुम्ही जबाबदारी सोपवली. विशेषांक निघाला. त्याचं प्रकाशन निखिल वागळेंच्या हस्ते केले. साधना सभागृहात कार्यक्रम घडवून आणला. अंक संपादन, प्रकाशन कार्यक्रम सगळं सुरू असताना तुम्ही मोकळेपणाने आम्हाला वावरू देत होता. शाबासकीची थाप देत होता. करा रे. होईल चांगलं... असं बिनधास्त प्रोत्साहन देत होता.

पुढे विनोदला तुम्ही तरुणांच्या विचार विश्वावर लाटा-लहरी हे सदर लिहायला लावलं. त्याच्या मागे लागून अक्षरशः लिहून घेतलं. पहिल्यांदा विनोदच्या मनात कसं लिहावं याविषयी दवीधा होती. मला तुम्ही सारखं बजावायचं, विनोद चांगला लिहिलं. त्याच सांग. लिही म्हण. मग मीही विनोदला गळ घालायचो. ते सदर चांगलं झालं. सर्वांना आवडलं.

हे सर्व करण्यामागे तुमचा हेतू स्पष्ट होता. साधनेत तुम्ही एका बाजूला मान्यवरांना लिहितं करत होता. तर दुसऱ्या बाजूला नवे लोक हेरून  त्यांना साधनेशी जोडत होता. धडपडणाऱ्या, लिहिणाऱ्या मुलांचं तुम्हाला खूप कौतुक आहे असं दिसायचं. अनुभवाला यायचं इथे तुमची नाळ मला साने गुरूजी आणि यदुनाथ थत्ते यांच्याशी जोडलेली दिसत होती. धडपडणारी लिहिती मुलं, माणसं  तुम्ही साधनेकडे अक्षरशः खेचून आणत होतात. तुम्ही कबडडीपटू संघात अव्वल दर्जाचे कॅचर होतात, असं ऐकून होतो. मला साधनेत नव्या लोकांना पकडून तुम्ही लिहीतं करत होता तेव्हा तुमचं कॅचर असणं अनुभवाला येत होतं.

पुढे मी मुंबईत आलो. माध्यमांत कार्य करत राहिलो. मुंबईत आलात की, तुम्ही फोन करायचाच. अंधश्रध्दा निर्मूलन कायदयासाठी मंत्रालयात फेरी मारायचा. अनेकदा तुमच्या बरोबर मंत्रालयात वावरायचो. मुख्यमंत्री, मंत्री यांच्याकडे तुम्ही या कायदयाचा विषय, त्याचा पाठपुरावा करताना पहायचो. या लोकांच्या अपॉइन्टमेंट मिळण्यात अडचणी येत. मुख्यमंत्र्यांना भेटताना नाकी नउ येत तुमच्या. एकदा अविनाश पाटील आणि तुम्ही होतात. मुख्यमंत्री  भेट होत नव्हती. विधीमंडळाचं अधिवेशन चालू होतं. अर्धा दिवस तुम्ही विधीमंडळ परिसरात हिंडत होता. तरी तुम्ही न चिडता पाठपुरावा करत होतात. म्हणायचा, त्यांचीही महत्वाची कामं असतात. आपण धीर धरला पाहिजे. लोकप्रतिनिधी, नोकरशहा यांना कळत होतं का?

मुंबईत तुम्ही भेटायचा तेव्हा नवं काय लिहितोय, काय वाचतोय असं विचारायचा. पुढे माझी काही पुस्तकं प्रकाशित झाली. एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रावसाहेब कसबे यांच्या उपस्थित पुण्यात एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात होता. तुम्ही विनोदला घेवून कार्यक्रमात आलात. तिथही शाबासकीची थापं दयायला विसरला नाहीत. चष्मयाच्या आडून तुमचे डोळे कौतुकानं बघत होते. नंतर तुम्ही म्हणालात, लिहित राहा. पण नुस्तं लिहू नको. लोकांत फिर. खूप वाच. आणि लढं.... तुम्ही काय म्हणत होता हे आज कानात सारखं घुमतंय. त्याचं महत्व कळू लागलंय याची भीषणता अनुभवत होतो. मंडपात अनेक कार्यकर्ते सैरभैर झालेले पाहत होता. काही रडत होते, काही फुंदत होते. काहींच्या डोळयात नुसते पाणी. काही सुन्न... तेव्हा आठववलं तुम्ही आणि सुभाष वारेंनी मला एकदा सांगितलं महाराष्ट्रभरातल्या काही कार्यकर्त्यांवर तू लिही. त्यांना भेटायचं त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या. त्याच्याशी जोडलेल्या लोकांशी चर्चा करायची आणि लिहायचं. तुम्ही उत्साहाने यादी काढली. दत्ता इस्वलकर, प्रतिभा शिंदे, सुबोध मोरे, किशोर ढमाले यांच्यावर मी लिहिलं. तुम्ही म्हणायचा, आत्ताचा काळ चळवळींसाठी विपरित. कार्यकर्ते एकाकी आपल्या कार्यक्षेत्रात लढत आहेत. त्यांना उभारी देणं हे साधनेचं काम. तुम्ही अनेकांना ही उभारी देत होतात.  म्हणूनच तुम्ही गेलात आणि कार्यकर्त्यांना पायाखालची जमीन खचल्यागत वाटलं.

मी काही मोठा लेखक नाही पण तुम्ही साधनेच्या एका कार्यक्रमात मला बोलण्यासाठी बोलावलं. अभिमानानं उपस्थितांना सांगितलं., राजा हा साधनेचा लेखक.

साताऱ्यात तुमच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देवून निघालो तेव्हा कानात शब्द घुमले, हा साधनेचा लेखक!

साताऱ्यात तुमच्या पार्थिवाला अखरचा निरोप देवून निघालो. तेव्हा कानात शब्द घुमले, हा साधनेचा लेखक! केवढा मोठा विश्वास तुम्ही दाखवला होता. मी अगदी नवखा लिहिता होतो तेव्हा तुम्ही मला उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं रिपोर्टींग करायला पाठवलं. हातात मुबलक पैसे दिलेत. कसं जा, कुठं रहा. कुणाशी बोल. काय विषय कव्हर कर, हे लहान मुलाला बोट धरून शिकवावं तसं सांगितलं. पुन्हा पाठीवर थाप. खांदयावर मायेनं हात ठेवून छान कर सगळं असे प्रोत्साहन!

गुजरातची विधानसभा निवडणूक तर तेव्हा ऐतिहासिक होती. दंगे नुकतेच झाले होते. माणसं मारली, कापली, जाळली गेली होती. सगळा गुजराती समाज खदखदत होता. दुःखाने आणि द्वेषानेही. तेव्हा तुम्ही म्हणालात, अशा काळात पत्रकाराने समाजात जावं. समाज क्रायसिसमध्ये, विसंगतीत जास्त कळतो. तू जा गुजरातमध्ये, समजून घे, रिपोर्टींग पाठव. लोकांना वाचायला आवडेल. गुजरातमध्ये नथुराम प्रवृत्तीनं केलेला हैदोस जवळून पाहत आला तो तुमच्यामुळेच. द्वेषाची विचारसरणी समाजावर हावी झाली की काय होवू शकतं हे अनुभवलं तेव्हा आणि आता द्वेषाच्या प्रवृत्तीनचं तुमचा घात केला. आता कळू येतंय, तुम्ही मला लिहितं करता करता काय काय पेरत होतात माझ्यात. माझ्या सारख्या अनेकांत. म्हणजे या समाजात.... तुमही या जमिनीत पेरत होतात नव्या नागरिकांचं बी. नवे नागरिक ज्यांचा हिंसेवर विश्वास नाही. भारताच्या राज्यघटनेवर ज्यांची श्रध्दा आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य, सामाजिक न्याय यांच्यावर ज्यांचा भरोसा आहे असे नागरिक. डॉक्टर, तुम्ही गेला आणि ते बीज तरारलेलं दिसलं. महाराष्ट्रात. तुमच्या हत्येची बातमी ऐकूण हा समाज निषेध करत रस्त्यावर आला तुमच्यासाठी.... तुम्ही पेरलेल्या मुल्यांसाठी... लोक म्हणाले, तुम्ही अमर आहात. तुम्हाला कोण मारू शकेल!

- राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com



Tuesday, June 4, 2013

देवेंद्र फडणवीस : ध्येयवादी भाजपेयी

















नागपूरचा तरुण महापौर, तरुण आमदार असलेले देवेंद्र फडणवीस उच्चशिक्षित आणि ध्येय्यवादी म्हणून राजकारण करीत आहेत. यामुळेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकले. त्यांची राजकीय वाटचाल तरुणांसाठी आदर्श ठरावी अशी आहे.   

देवेंद्र गंगाराव फडणवीस (वय - ४३ वर्ष) हे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले, तेव्हा कुणालाही आश्चर्याचा धक्का बसला नाही. उलट, ते आता पुढे काय करतील? याकडे अनेकांचं लक्ष आहे. देवेंद्र यांनी आमदार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीच होती. त्याहीआधी १९९७ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांनी सन्मान मिळावला. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले, तेव्हा या पोर्वायीन, चिकन्या चोपड्या उमेदवाराचं नागपूरकरांना खूप कौतुक वाटलं होतं. नागपूर विद्यापीठातून देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच कायद्याची पदवी मिळवली होती. हिंदू कायदा या विषयात त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं. बिझिनेस मँनेजमेंट पदव्युत्तर पदवी आणि प्रोजेक्ट मँनेजमेंटमधील मेथड्स आणि टेक्निक्समध्ये बर्लिन विद्यापीठातून डिप्लोमा असं आधुनिक शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस नागपूरचे मध्यवस्तीतले आमदार झाले. 

गेली १३ वर्ष देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून काम करत आहेत. या काळात त्यांनी राज्य सरकारचे अनेक घोटाळे उघड केले. विधानसभा सभागृहात सरकारला धारेवर धरणारा आमदार, विविध संसदीय आयुधं वापरून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता, अशी प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केली. news channel च्या चर्चेत स्वतःचा ठसा उमटवताना ते दिसू लागले. आता नव्या जबाबदारीने त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्यात. दिल्लीहून पक्षाध्यक्ष पदाची माळ गळ्यात घालून देवेंद्र मुंबईत विधानभवन परिसरात दाखल झाले, तव्हा फक्त भाजपचे कार्यकर्तेच नव्हे, तर इतरही लोक त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत होते. विधानभवन परिसरात पत्रकारांच्या - कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणारे देवेंद्र चित्रलेखाशी बोलताना नव्या जबाबदारीविषयी म्हणाले, ' भाजपमध्ये पक्षाचा अध्यक्ष ही व्यवस्था आहे. मी सर्वांना घेऊन काम करीन. आता राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळी जनतेला धीर देत त्यांना मदत होईल, सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यासाठी भाजपचे आम्ही नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, दुष्काळी भागात जाऊ, भ्रष्ट, अकार्यक्षम, आणि असभ्य राज्य सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आम्ही लढू. सर्व विरोधी पक्षांना एक व्हा, असं  आवाहन मी केलं. राज्यात शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआय, शेकापसह सर्वांची एकजूट व्हावी, अशी माझी इच्छा आहे. उद्याची राज्यातली सत्ता आमचीच असणार !'

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा लढाऊ नेता आहे. ते स्वतंत्र विदर्भवादी आहेत. महाराष्ट्रावाद्यांना त्यांनी नागपूरच्या विधानभवनातून चले जाव असं एकदा सुनावलं  होतं. तेवढा एक वाद सोडता ते फारसे वादग्रस्त कधी झाले नाहीत. सौजन्यशील आणि अभ्यासुपनाचा वारसा त्यांनी त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून घेतलाय. गंगाधरराव फडणवीस पदवीधर मतदारसंघातून एकदा आमदार होते. पण त्यांचं अकाली निधन झालं. गंगाधरराव शरद पवार, यांचे जवळचे मित्र होते. 

देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात येण्याचा निर्णय काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवून घेतला. करियर कसं करायचं याविषयी त्यांच्या मनात स्पष्टता होती. त्यांचा शैक्षणिक बायोडाटा उत्तम होता. वकिली सुरु करून लोकांची कामं करायची, त्यांना न्याय मिळवून द्यायचा, हा एक मार्ग होता. दुसरी वाट होती, राजकीय पक्षात काम करून व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत उतरण्याची ! त्यांनी राजकारणाची वात निवडली. याविषयी चित्रलेखाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचो. संघाच्या विचारांचा माझ्या कुटुंबावर पगडा होताच. वडील गंगाधरराव स्वयंसेवक आणि मोठे नेते होते. त्यांना त्यावेळच्या जनसंघात मोठा मान होता. विदर्भात सर्वजन त्यांची इज्जत करत. राजकीय पक्षापलीकडे त्यांना मान्यता होती. मी शालेय वयात नंतर कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम नागपुरात करू लागलो. पूर्णवेळ कार्यकर्ता बनावं, असं  माझ्या मनात होतं. पण नंतर काही ज्येष्ठ सहकारयानी आग्रह केला. मी भारतीय जनता पक्षात दाखल झालो. राजकीय पक्ष हे सर्वंकष परिवर्तनाचं  एक मध्यम आहे. आपण लोकशाही मानतो. लोकशाहीत राजकारणाच्या माध्यमातूनच प्रभावी सामाजिक काम करता येतं. हा मार्ग मी स्वीकारला. खरं तर मला लंडनला जाऊन barrister होण्याची इच्छा होती. नागपुरात मी कायद्याचा पदवीधर झालोच होतो. परदेशात जाऊन शिकण्याची तीव्र इच्छा होती. कायद्याच्या शेवटच्या वर्षाला असतानाच नगरसेवक झालो, महापौर झालो.  माझ्या जीवनाला वेगळं वळण मिळालं. माझं barrister बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.'

राजकारणातली देवेंद्र फडन्विस्यांची इंनिंग जोरात सुरु झाली. देशातला दुसऱ्या नंबरचा सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांनी रेकॉर्ड नोंदवला. नागपूरचे महापौर म्हणून त्यांनी एका दिवसात मुंबईहून १२० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी मंजूर झालेल्या या योजनेमुळे आजही नागपूरकरांना पाणीटंचाई जाणवत नाही. एवढी ही योजना महत्वाची ठरली. महापौर, आमदार म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर वडिलांकडून झालेले संस्कार प्रभावी ठरले. वडील लवकर गेले, पण त्यांच्या संस्कारांची शिदोरी आठवली की, देवेंद्र फडणवीस भाऊक होतात. याबाबत ते म्हणाले, 'माझे वडील लवकर गेले, त्यांचं  जीवन म्हणजे साधेपणा आणि उच्च जीवनमूल्यं यांचा संगम होता. ते अजातशत्रू होते. संघटना- पक्ष यांच्यापलीकडे सामान्य लोक त्यांच्यावर आपला माणूस म्हणून प्रेम करत. विदर्भातला कुणीही माणूस त्यांच्याकडे काम घेऊन येई. प्रत्येकाला विश्वास असे की, गंगाधरराव आपलं काम करतील. वडिलांच्या मृत्युनंतर मी लोकांमध्ये जात असे. तेव्हा लोक मला गंगाधार्रावांचा मुलगा म्हणून खूप मान देत. गंगाधार्रावांचा मुलगा आहे म्हणजे नक्कीच याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, अशी लोकांची धारणा होती. मला लोकांची ती धारणा जबाबदार बनवून गेली आहे. हे वडिलांचं ऋण मी कधीही विसरणार नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी वाटचाल करतोय.'

सध्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. राजकारणातला माणूस म्हणजे चोर, लबाड, ढोंगी, अशी अनेकांची भावना असते. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाबद्दल आशावादी आहे. त्यांच्यावर अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा प्रभाव मोठा आहे. याविषयी ते म्हणाले, 'राजकारणात राहून खूप काही करता येतं. स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं आहे की, काही बनणं हे ध्येय नसावं. काही चांगलं करणं  हे उद्दिष्ठ हवं. या उक्तीचा प्रत्यय वाजपेयी यांच्या जीवनात मला दिसला. मला प्रेरणा देणारे ते एकमेव नेते आहेत. त्यांना स्टेटसमन म्हणता येइल. राजकारणातला बेंचमार्क म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. त्यांना फॉलो करत मी इथपर्यंत आलोय. मूल्य, विचार, कारभार आणि कार्यक्षमता याबाबतीत त्यांना मी आदर्श मानतो. वाजपेयी नेहमी म्हणत, पद म्हणजे प्रतिष्ठा नाही तर जबाबदारी होय. वाजपेयींचे हे विचार समजून घेतले, तर मला कूप आशावादी वाटतं. तरुणांना मी आवाहन करीन की त्यांनी मोठ्या संख्येने राजकारणात यावं. इझी मनी मिळवायचं साधन म्हणून इकडे येऊ नका.  इझी मनी मिळवनाऱ्यांचं सार्वजनिक जीवन थोडक्यात संपतं. ते कुणाचंही भलं करत नाहीत. म्हणून मी तरुणांना म्हणेन की, कोणती तरी विचारसरणी घेऊन राजकारणात काम करा. तुम्ही समाजवादी असा, कम्युनिस्ट असा, अगर हिंदुत्ववादी. मी हिंदुत्ववाद स्वीकारला, रा. स्व. संघाचा वारसा खांद्यावर घेतला आहे.'

देवेंद्र हे चांगले वक्ते आहेत. वरच्या पट्टीत बोलतात. त्यांच्याशी बोलताना ते जाणवत होतं. पण त्यांना आता 'स्वतंत्र विदर्भ' ची पट्टी सोडावी लागेल. कारण ते आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. 

- राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com

Wednesday, May 1, 2013

संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे




































पडदा उघडतो. नाटक पाहायला आलेल्या रसिकांना महाराष्ट्राचा नकाशा दिसू लागतो. या नकाशात बेळगाव सीमाभाग आणि महाराष्ट्र राज्य यात ठळक सीमारेषा दिसते. मग नकाशावर 'झालाच पाहिजे' हे नाव येतं. त्यानंतर सीमारेषा गायब होते. आता संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा दिसू लागतो आणि रंगमंचावर शाहीर प्रवेश करतो.… डफावर थाप पडते… शाहिराचं गीत सुरु होतं. 

… झालाच पाहिजे या नव्या नाटकाची सुरुवात हि अशी आहे. नाट्यसंपदा या नाटकाची निर्मिती असलेलं  हे नाटक. नितेश राणे मुख्य प्रवर्तक असलेल्या महाराष्ट्र कलानिधी या संस्थेने ते रंगमंचावर आणलं  आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर,भालकी, औराद, बसव-कल्याण, हलियाळ या मराठी भाषिक बहुल भागातल्या मराठी माणसांवर कर्नाटक सरकार करत असलेल्या अन्याय-अत्याचारांचं ज्वलंत दर्शन घडवण्यासाठी या नाटकाचा घात घातला आहे. या मराठी बांधवांचं दुःख, असंतोष मांडत त्यांना न्याय मिळावा, म्हणून समस्त मराठीजनांना त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची हक या नाटकातून देण्यात आलीय. 

१ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये दुपारी ४ वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. तिथे दुसरा प्रयोग होईल. नितेश राणे आणि नाट्यसंपदाचे अनंत पणशीकर यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या नाटकाची घोषणा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना स्मरून अभिनेता नाना पाटेकर, सुबोध भावे यांच्या खास उपस्थितीत करण्यात आली होती. त्याचा गाजावाजा करण्यात आला होता. तेव्हाच मराठी माणसांचं या नाटकाकडे लक्ष वेधलं गेलं होतं. 

या नाटकाची कल्पना कशी सुचली ? नाटकाची निर्मिती कशी साकार होत गेली ? काय काय तयारी केली ?

याविषयी निर्माते अनंत पणशीकर चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'आमच्या नाट्यसंपदा या संस्थेला यावर्षी पन्नास वर्षं पूर्ण झालीत. आम्ही अनेक चांगली नाटकं आजपर्यंत केलीत. काही नवं, वेगळं, सामाजिक संदेश देणारं नाटक करावं याच्या शोधत आम्ही होतो. दरम्यान, नितेश राणे यांची भेट झाली. त्यांनी महाराष्ट्र कलानिधी हि संस्था काढली. नाटक, टीव्ही, चित्रपट अशा कलाक्षेत्रात सकस काही करावं, अशी इच्छा असल्याचं त्यांच्या बोलण्यात आलं. मी आपण एखादं नवं नाटक करूया असं  त्यांना बोललो. ते म्हणाले, सीमावासियांचं दुःख मोठं  आहे. तो प्रश्न दररोज भळभळतोय. त्यांच्यावर दररोज अन्याय होतोय. त्यावर नाटक करा. त्यांनी सुचवलेला विषय आम्हा सर्वांना भावला. त्यातून 'झालाच पाहिजे' नाटकाची कल्पना मूर्त रुपात आली. प्रदिप्र राणे यांना लेखनाची जबाबदारी दिली. आणि आम्ही सीमा भागात दाखल झालो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १०५ हुतात्मे झाले. त्यापैकी ५ जण बेळगाव परिसरातले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यांची दुःख ऐकली. सीमा प्रश्नांसाठी लढणारया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भेटलो. आणि त्यातून हे नाटकाचं कथानक आमच्या मनात पूर्ण झालं. 

सीमावासियांच्या प्रश्नांवर आजवर नाटक, चित्रपट अशा कलाकृती निर्माण झाल्या नाहीत. यावर वैचारिक लेखन पुष्कळ झालं. म्हणून अशा सामाजिक, भाषिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर नाटक लिहिणं, हे मोठं आव्हान असतं. 

या नाटकाचे लेखक प्रदीप राणे 'झालाच पाहिजे' च्या लेखनाबद्दल चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'सीमावासीयांची भळभळती जखम काय आहे, हे या नाटकात उलगडून दाखवलंय. त्यांचं नुसतं दुःख मांडणं हा उद्देश नाही. त्यांच्या लढाईला बळ देण्यासाठी उभा महाराष्ट्र जागा करणं, त्यांच्या मागे साऱ्या मराठी माणसाचं बळ उभं करणं, यासाठी हे नाटक आहे. महाराष्ट्रभर आणि सीमा भागात याचे प्रयोग व्हावेत, असा आमचा संकल्प आहे. या नाटकाच्या लेखनासाठी सीमावासीयांच्या लढ्याविषयीचे अनेक संदर्भग्रंथ,वर्तमानपत्रातले लेख, संबंधित पुस्तकं, सरकारी दस्तऐवज, इतर साहित्य यांचा अभ्यास केला. हा विषय वैचारिक - सामाजिक असला तरी तो मनोरंजक स्वरुपात करत सादर करावा, अशी कल्पना सर्वांचीच होती. म्हणून लोकनाट्याचा फॉर्म निवडला. गण-गवळण, महाराष्ट्र गीत, काताव, लोकशाहीर अमर शेख यांची गाणी, पोवाडा, कविता, बतावणी, सीमावासीयांचे - अभ्यासकांचे व्हिडिओ क्लिपिंग इंटरव्ह्यू अशा फॉर्ममध्ये नाटक सादर होत जातं. या नाटकातून मनोरंजन करत सीमाप्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.'

या नाटकाचं संगीत अजय-अतुल, लोकशाहीर संभाजी भागात आणि कमलेश भडकमकर यांनी दिलंय. नेपथ्य सुबोध सावजी यांनी केलंय. नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांचं आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. 

नाटकाचा गण नाटकाचा उद्देश काय आहे, ते रसिक प्रेक्षकांना उलगडून दाखवतो, तो गण असा - 

रसिक जनांचा जमला मेळा, रंग चढू दे आमच्या खेळा
सल कळू दे, व्यथा भिडू दे; आत्मप्रतिष्ठा महाराष्ट्र हलू दे 
सुबुद्धी देण्या झणी अवतरा, गणपती बाप्पा मोरया. 

अजय-अतुल यांनी या गणाला संगीत दिलंय. खेळाला रंग चढू दे आणि सल कळू दे, व्यथा भिडू दे, या उद्देशाने नाटक पुढे साकारलं जातं. कृष्ण, पेंद्या, मावशी, रेखा-सीमा या गवळणी राजपुत्र, प्रधान, राणी यांच्या संवादातून नाटक रंगत जातं. हलके-फुलके विनो, चुटके, चिमटे, इशारे, प्रश्न, टवाळक्या अशा खेळीमेळी प्रकारांतून नाटकातून प्रेक्षकांशी थेट संवाद होतो. सीमा व रेखा या गवळणीच्या लावणी आणि नृत्यातून सीमा प्रश्न मांडलाय, तो असा - 

वाट पाहुनी शिणली काया, नाही का तुमची मजवर माया !
या सीमा-रेखेचा खद पहारा, भेदु कशी मी राया !
साजणा जर या सीमेला झुलवा 
मर्द रे जरा या रेखेला डूलवा 
राया तुम्ही सीमा रेखेला हलवा हलवा हलवाना 

सीमावासीयांच्या लढाईकडे उदासीनतेने पाहणाऱ्या आणि दूर राहणाऱ्या मराठी बांधवांना याच लावणीतून लढ्यात सामील होण्याचं प्रियकर प्रेयसीला करतो तसं अर्जाव केलं जातं, ते असं - 

किती सहन करू मी, एकटी कशी लढू मी
टीमही घातलीय हाताची घडी, बावरली थकली मी बापुडी 
नातं आपलं युगायुगाचं, इतिहास आहे साक्षी 
हि रेखा आडवी येते कशी ?

सीमावासीयांच्या लढ्याशी नातं जोडण्याचं प्रेमळ आवाहन करत ही लावणी मराठी बांधवांना मर्दपणाच्या वारशाची आठवण करून देते. आणि सीमा लढ्यात उडी घेण्याचं, शौर्य गाजवण्याचं आवाहन करते, ते असं - 

तू मर्द मावळा गाडी, चाल मार एक तू उडी 
भेद सीमेची कडी, शह देणारे मारतील दडी, 
हीच आहे ती घडी 
राया तुम्ही सिमारेखेला हलवा हलवा हलवाना. 

मावशी, कृष्ण, पेंद्या यांच्या हलक्या-फुलक्या सीमाप्रश्न नेमका काय आहे, यावर नाटकात भाष्य होतं. त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली जाते. या समस्येचं मूळ समजावण्याचा प्रयत्न केला जातो. सीमा भागातले कार्यकर्ते, नेते, अभ्यासकांचे इंटरव्ह्यू अधूनमधून येतात. त्यातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नेमका काय आहे ? बेळगावचं दुखणं कसं  आहे ? हे समजतं 

१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. तेव्हा बेळगाव जिल्हा मुंबई प्रांताचा भाग होता. १९४८ मध्ये बेळगाव नगरपरिषदेने सीमा आयोग आणि भारत सरकारला विनंती केली की, बेळगाव जिल्ह्याला नियोजित संयुक्त महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करा . कारण आम्ही बहुसंख्य मराठी भाषा बोलतो. तेव्हा मराठी भाषिक राज्यात जाण्याचा आमचा हक्क मान्य करा. 

पण ते होणं नव्हतं. १९५६  मध्ये बेळगाव जिल्ह्याचा समावेश नव्याने निर्माण झालेल्या म्हैसूर (आताचं कर्नाटक) राज्यात करण्यात आला. तेव्हा बेळगाव जिल्ह्यात दोन तृतीयांश मराठी लोक वास्तव्यास होते. तरी बेळगाव कन्नड भाषिक राज्यात जावं लागणं, हे दुःखद होतं. यात सरळ मराठींच्या हक्काची गळचेपी झाली. 

आता थोडा इतिहास बघू. १८ व्या शतकात मराठा साम्राज्याबद्दल म्हटलं जाई, कि ते अटक ते कटक पर्यंत पसरलं आहे. आताच्या कर्नाटकचा उत्तर भाग बहुतांशी तेव्हाच्या मराठा साम्राज्याचा भाग होता. ब्रिटीशांची सत्ता असतानाही या भागात सुरुवातीच्या काळात मराठा सरदारांच्या जहागिरया होत्या. असं असलं तरी, बेळगाव परिसरावर अन्याय झालाच आणि सीमावासियांचा न्यायासाठी संघर्ष सुरु झाला. महाराष्ट्रात येण्याची त्यांची मागणी जोर धरू लागली. १९५३ - ५४ मध्ये संघर्षाची लढाई मूळ  धरू लागली. मग वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने ५ जून १९६० रोजी महाजन आयोग नेमला. या आयोगाने महाराष्ट्राचे दोन आणि कर्नाटकचे दोन प्रतिनिधी असा चार सदस्यांचा समावेश होता. या आयोगाने चार मुद्यांवर विचार करावा आणि निर्णय घ्यावा, असा महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचा आग्रह होता.  ते मुद्दे असे - 

१) खेडं हे युनिट ठरवावं. 
२) भौगोलिक सलगता बघावी. 
३) मराठी व कन्नड भाषा बोलणार्यांची संख्या बघावी. 
४) लोकांची इच्छा काय, ते बघावं. 

या मुद्द्यांवर दोन्हीकडच्या प्रतिनिधींचं एकमत होऊ शकलं नाही. तेव्हा हे प्रकरण बारगळलं. 

सेनापती बापट यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधलं, उपोषण सुरु केलं. त्यांनी मागणी केली की, सीमाप्रश्नावर तोडगा काढायला नवा आयोग नेमा. तेव्हा महाराष्ट्र सरकारने केंद्राला विनंती केली . मग केंद्राने पुन्हा २५ ऑक्टोबर १९६६ रोजी महाजन आयोग स्थापला. त्यावेळचे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे तिसरे मुख्य न्यायाधीश मेहेरचंद महाजन हे या आयोगाचे अध्यक्ष होते. 

सेनापती बापटांनी उपोषण केलं त्याही आधी सीमावासियांचा संघर्ष सुरूच होता. खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेते साठी एसेम जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत दंगे, आचार्य अत्रे यांनी सीमावासियांना लढ्यात येण्याची गळ घातली. या मोठ्या लढ्यामुळे सीमालढा झाकला गेला. पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला. त्यात शाहीरांसह सामान्य जनतेचं स्वप्न बेळगाव, डांगसह संपूर्ण महाराष्ट्र व्हावा, हेच होतं. ते स्वप्न लोकशहिर आत्माराम पाटील यांच्या संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ या गाण्यातून व्यक्त झाला आहे, ते गीत असं - 

संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा 
खुशाल कोंबडं झाकून धरा 
द्विभाषिकाचा दुतोंडी कावा, उडतोय माझा डोळा डावा 
साडेतीन कोट सिंहाचा छावा,पकडलाय मांडलाय पिंजरा नवा 
वळीखलाय आम्ही जवाच्या तवा,
शाहिरी साद गेली गावोगावा 
बेल्हारी बेळगाव, पंढरी पारनाव, बोरी उंबरगाव, राहुरी जळगाव 
सिन्नरी-बरतार-भंडारा-चांदा सातारा सांगली 
कारवार डांग अन मुंबई माली 
जागृत केलाय दक्खनपुरा,
खुशाल कोंबडं झाकून धरा - 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सीमावासीय एकजूटीने उतरले. या आंदोलनाचा रेटा मोठा होता. तेव्हा आपल्यालाही न्याय मिळेल, असं सीमावासियांना वाटलं होतं. शिवाय गुजरात विभागातल्या डांग परिसरातल्या मराठी जनतेलाही संयुक्त महाराष्ट्रात यायची तीव्र आस होती. बेळगाव आणि डांगच्या मराठी जनतेचं स्वप्न एक झालं होतं. ते स्वप्न त्यावेळी शाहिर भास्कर मुणगेकर यांच्या गाण्यात उमटलं होतं, ते असं - 

सीमेच्या वादाला सीमाच नाय मुळी न्यायच नाय 
करबंदी वाचून इलाज नाय आता नाय नाय 
माझं ते माझं नि तुझं ते माझं हे जमायचं नाय 
खंडणीचा सौदा पटायचा नाय आम्हा नाय नाय 
डांगाच्या रानाचं ,सागाच्या झाडाचं, मानाचं पण 
मानाचं पान आम्ही देणार नाय 
बेळगाव, बिदर, निपाणी, कारवार, 
कानडी सरकार टिकायचं नाय, तिथं चालायचं नाय
दुतोंडी त्याचं  चालणार नाय, चोरांना कुरण देयाचं नाय 

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राच्या राज्यस्थापनेनं पूर्ण झालं खरं. पण संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव, डांग काही आलं  नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली अशी तिथल्या जनतेची भावना झाली. तीच भावना आज बळावताना दिसतेय. नेमक्या अशा काळात हे नाटक येतंय. सीमाप्रश्नाची तीव्रता हे नाटक कशी सादर करणार, याविषयी चित्रालेखाशी बोलताना नितेश राणे म्हणाले, 'बेळगाव, निपाणीचे मराठी लोक दररोज भरडले जात आहेत. बेळगाव महापालिकेचे माजी महापौर विजय मोरे यांच्या तोंडाला काळं लावण्यापर्यंत कन्नड लोकांची मजल गेली. शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा त्यांनी जाळला. मराठी शाळांवर अत्याचार केले जातात. बेळगावला कर्नाटकाचं विधानभवन बांधलं. बेळगाव शहराला कर्नाटकाची उपराजधानी घोषित करण्यात आलं. गुढीपाडव्याला मराठी बांधवांनी लावलेले banner फाडले, उतरवले. हा वाद डिसेंबर २००५ पासून सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. न्यायालय त्यावर सन्माननीय निकाल देईल. पण तोपर्यंत तिथल्या मराठी जनतेवर अन्याय व्हायला नको. महाराष्ट्रात कन्नड नागरिक बांधव सुरक्षित राहतात. मग कर्नाटकात मराठींवर अन्याय का ? इथल्या कन्नड बंधूनी हे नाटक बघावं. मराठी सीमावासियाचं  दुःख समजावून घ्यावं. कर्नाटकातील सरकार व जनतेला हे दुःख समजावून सांगावं. अन्यथा तिथल्या मराठींवर होणारे अन्याय थांबले नाहीत, तर उद्या  इथल्या कन्नडीगांवरही लोक रागावतील. त्याची प्रतिक्रिया हिंसक उमटू शकेल. आम्ही आज समंजस भूमिका घेतोय, पण उद्या अनर्थ घडू नये. शिवाय सीमावादाबद्दल सातारा, कोल्हापूर, सांगली भागात लोकांना आस्था आहे, तशी मुंबई, कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, विदर्भातील लोकांत दिसत नाही. त्यांना या प्रश्नाची तीव्रता कळावी म्हणून हे नाटक आहे. महाराष्ट्रातल्या कन्नड आणि मराठी बांधवांमध्ये हे नाटक नक्कीच जाग आणील.'

संयुक्त महाराष्ट्र चळवळीने सीमावासीय फसवले गेले आणि महाजन आयोगाने दिलेल्या अहवालाने तर त्यांच्या जखमेवर acid ओतलं. महाजन आयोगाने २ हजार २४० लोकांकडून सूचना स्वीकारल्या, ७ हजार ५७२ लोकांची मतं जाणून घेतली आणि अहवाल दिला. महाराष्ट्राने बेळगाव जिल्ह्यातली ८१४ गावं मागितली होती, तिथे या अहवालाने २६२ गावं देण्याचं सुचवलं. निपाणी, खानापूर, आणि नंदगडचा त्यात समावेश होता. कर्नाटकला ५१६ गावं देण्याची सूचना केली. त्यातली २६० गावंच फक्त कन्नड भाषिक बहुल आहेत . शिवाय सोलापूर शहर जिल्ह्यातल्या काही गावांसह २४७ गावं  कर्नाटकला द्यावी, अशी खुंटी महाजन आयोगाने ठोकली. 
महाजन आयोगाचा अहवाल थोडक्यात असा - 

* बेळगाव कर्नाटकातच राहील,
* जत, अक्कलकोट, सोलापूरसह २४७ खेडी, गावं  कर्नाटकला द्यावीत. 
* चंदगड, निपाणी, खानापुरसह २६४ गावं  महाराष्ट्राला द्यावीत. 
* कासारगाडे हा केरळचा भागही कर्नाटकला द्यावा. 

हा अहवाल कर्नाटकधार्जिणा आहे. असं सीमावासियांसह समस्त महाराष्ट्राचं  जनमत झालं. केरळलाहि हा अहवाल मान्य नव्हता. असंतोष धुमसत राहिला. १९४८ सालापासून सीमाप्रश्नावर काम करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सुरु झालेलं सीमा आंदोलन तेव्हापासून आजपर्यंत धुमसत आहे. 
हे नाटक ३ मे  रोजी बेळगावात सादर होईल. ते एका वेगळ्या पार्श्वभूमीवर ५ मे  रोजी कर्नाटक राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे. नुकतंच बेळगावातील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर भावना भडकवणारं भाषण केलं म्हणून कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्र एकीकरण  समितीचे उमेदवार सीमाप्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वातावरण गरमागरम आहे. कर्नाटकात राजकीय अस्थिरता आहे . कुठल्याही पक्षाला बह्हुमत मिळणार नाही. समितीचे पाच-सहा आमदार निवडून आले, तर त्यांच्याकडे राज्याच्या सत्तेची चावी येऊ शकते. 

अशा वातावरणात या नाटकाने भाषा प्रांतवादात काही ठिणगी पडेल का? ते आता काही सांगता येणार नाही. हे नाटक विजय केंकरे आणि संतोष पवार या दोन वेगळे बाज असणाऱ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलंय. मुंबईत दादरच्या याश्वत नाट्य मंदिराच्या संकुलात या नाटकाचा सराव सुरु असताना संतोष पवार चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'राजकीय वादात आम्ही जाऊ इच्छित नाही. कर्नाटकात नाटककार गिरीश कर्नाड सारखे चांगले लोकही आहेत. या नाटकात सीमावासियांचा प्रश्न मनोरंजनातून समजावून देण्याचा प्रयत्न आहे. सात प्रमुख कलाकार आणि त्यांच्या जोडीला इतर ५० जन असा भरगच्च संच आहे. नृत्य, लावणी, पोवाडे, गाणी, सुरेल लोकसंगीत, हसवणूक, मध्येच गंभीर चर्चा, मुलाखती, मत-मतांतरं असं नाटक रंगत जातं. त्यात कुठे प्रक्षोभक, टोचणारी भाषा नाही. हि एक प्रबोधन घडवणारी कलाकृती आहे.'

लोकशाहीर संभाजी भागात यांचं वेगळ्या बाजाचं संगीत या नाटकात आहे. या नाटकात शाहीर म्हणतो- 

ऊठ महाराष्ट्रा ऊठ 
वारस तू शूरांचा, वीरांचा, शिवबांचा, हुतात्म्यांचा 
पाच दशके लढत राहिले 
न्याय, हक्क, अस्मितेसाठी त्याचा साठी होशील का ? 
'झालाच पाहिजे' अशी गर्जना पुन्हा देशील का ? 

नाटकाच्या संगीताबद्दल संभाजी भागात चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'या नाटकामुळे शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे व गवाणकर यांची आठवण महाराष्ट्राला पुन्हा येईल. त्यांचा वारसा जागवणारी गाणी, पोवाडे व लावण्या नाटकात आहेत. त्याचप्रमाणे आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली  पोवाडा आहे, तो असा- 

वाजली तुतारी, भेदी नगारे ; माझा डफही तापला
प्रथम वंदितो हुतात्म्यांना, मी या वक्ताला !
महाराष्ट्र मिळाला, मुंबई आमची 
काय आम्ही गुन्हा केला ?
सीमा भाग का दिला कर्नाटकला ?
महाराष्ट्र प्रेम, भाषा, संस्कृती जपली 
महाराष्ट्रात येण्याची आस बाळगली 
हाच का तो गुन्हा ? मग गप्प का बोला ? 

- सीमावासियाचं दुःख, भावना पुन्हा चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून कलात्मक पद्धतीने होणार आहे ? तसा खटाटोप आम्ही केला आहे.'

या नाटकाचा उद्देश किती सफल होईल ?  त्याला लोकांचा किती प्रतिसाद  लाभेल हे पुढे  दिसेलच. पण सीमावासीयांच्या असंतोषाचं  काय ? त्यांना न्याय कधी मिळणार ? त्यांची फसवणूक वारंवार होतेय त्याचं काय ? याच नाटकात कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आहे, त्या कवितेतल्या जनतेसारखी सीमावासीयांची परिस्थिती आहे, ती कविता अशी -

जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे, 
जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे. 
जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, 
जनतेच्या बाहुंमध्ये सागराचे बळ  आहे. 
जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे,
जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे
जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे,
आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे. 

सीमावासीय मराठी जनतेचा महाराष्ट्रीयन होण्याचा आग्रह अमर आहे. त्या आग्रहाची पूर्ती होण्यासाठी समस्त मराठींनी 'डांग-बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्र … झालाच पाहिजे !' या नाट्यपूर्ण आरोळीला दाद आणि साथ दिलीच पाहिजे. 

- राजा कांदळकर 
   rajak2008@gmail.com

Wednesday, April 17, 2013

भैय्या देशमुखांवर अजितदादा का घसरले ?


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
प्रभाकर उर्फ भैय्या  देशमुख या नावामुळे आणि त्यांच्या आंदोलनामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अडचणीत आले. अजितदादांनी इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील सभेत  देशमुखांच्या नावाचा उल्लेख करून स्वतःवर आफत ओढवून घेतली. देशमुख मात्र रातोरात हिरो झाले. मुंबईत आझाद मैदानात दोन महिने ते मोहोळ (जि. सोलापूर) तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, जनावरांना प्यायला पाणी मिळावं म्हणून धरणे आंदोलन करत आहेत. त्याकडे कुणाचं लक्ष गेलं  नव्हतं . या घटनेनंतर मात्र मिडियाचे लोक आझाद मैदानात देशामुखांभोवती गराडा घालू लागलेत. 

कोण आहेत हे भैय्या देशमुख ?
देशमुख पाटकुल (ता. मोहोळ, जि. सोलापूर) या गावचे रहिवासी, वय - ४०. उन्हाने रापलेला चेहरा आणि लढायची जिद्द चेहऱ्यावर दिसते. मोहोळ पंचायत समितीचे सदस्य आहेत. तिथल्याच भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालकही आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले भैय्या मराठी विषयात पदवीधर झाले अन विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. पाच वर्ष मोहिते पाटलांबरोबर काम केलं अन नंतर भैय्या यांनी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटना स्थापन केली. खांद्यावर नांगर घेतलेला शेतकरी हे या संघटनेचं चिन्ह आहे. 'कष्टकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा' हे या संघटनेचं  ब्रीदवाक्य आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं  या संघटनेमार्फत देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी आजपर्यंत केलीत. ५ फेब्रुवारी २०१३ पासून मोहोळ तालुक्याला उजनी धरणाचं  पाणी मिळावं  म्हणून देशमुख आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरु केलं. 

येत्या १५ एप्रिलला मुंबईत मलबार हिल परिसरातील अजितदादा यांच्या 'देवगिरी' बंगल्यावर देशमुखांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा नेणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्ष बंगल्यावरही आंदोलन करण्याचा या शेतकऱ्यांचा निर्धार आहे. 

देशमुखांच्या आंदोलनाच्या मागण्या नेमक्या काय आहेत ? याविषयी देशमुख आझाद मैदानात बोलताना म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील पवना, भामा आसखेड, खडकवासला किंवा इतर कोणत्याही १६ धरणांतील पाणी उजनी धरणात सोडण्यात यावं. नंतर हे पाणी उजनीच्या उजव्या-डाव्या कालव्यात आणि आष्टी येथील तलावात सोडायचं. त्या तलावातून हे पाणी मोहोळसह सोलापूर जिल्ह्यात इतर तालुक्यातल्या अनेक गावांतील शेतकरी आणि जनावरांना पिण्यासाठी उपयोगी येईल. त्यातून दुष्काळाची तीव्रता कमी होईल. अशी आम्हां आंदोलकांची मागणी आहे.'

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या देशमुखांवर अजितदादा का घसरले ? देशमुख याविषयी म्हणाले, 'उजनी धरणातले पाणी दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न देता बारामतीच्या डायन्यामिक्स दुध डेअरीला बेकायदा दिले. असं  पाणी मिळावं  म्हणून बारामती नगरपालिकेने बेकायदा ठराव केला. त्यामुळे उजनीच्या उजव्या-डाव्या कालव्याच्या परिसरातील नागरिकांवर अन्याय झालाय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरांनाही प्यायला पाणी नाही. १५ हजाराची म्हैस शेतकरी ५०० रुपयाला कत्तलखान्यात विकतोय. माणसं शहरांकडे स्थलांतर करताहेत. लहान लेकरं  उपाशी मरताहेत. मी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही भेटलोय. अजितदादांची मनमानी जनतेपुढे मांडण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे.'

डायन्यमिक्स दुध डेअरीला पाणी उपसून घेत अन आम्हाला देत नाही म्हणून देशमुखांनी अजितदादा, पुणे विभागाचे आयुक्त, सोलापूरचे जलसंपदा खात्याचे अधिक्षक अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरलीय. ऐन दुष्काळात पाण्याचं  हे राजकारण पेट घेतंय. देशमुख आपल्याला टार्गेट करतोय हे अजितदादांना सहन झालं  नाही. म्हणून त्यांनी इंदापूरच्या सभेत देशमुखांची खिल्ली उडवली आणि त्यानंतर ते स्वतः अडचणीत आले. 

यामुळे एक मात्र बरं झालं देशमुखांच्या आंदोलनाची दाखल घेतली गेली. सोलापूरच्या शेतकऱ्यांना उजनीचे पाणी द्यावे असा निर्णय आता उच्च न्यायालयानेही दिला आहे. 

मोहोळच्या शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळतंय किंवा नाही हे महाराष्ट्र बघेलच. 

- राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com

Monday, April 15, 2013

संतविचारांचं कीर्ती - गान देई महाराष्ट्राला भान












 
 
 
 
 
 
सकळांचे पायी माझे दंडवत , आपुलाले चित्त शुद्ध करा 
अहो श्रोते वक्ते सकळही जन , बरे पारखून घ्या रे हाती -
 
 
नवी मुंबईत वारकरी साहित्य परिषदेने १६, १७, १८ फेब्रुवारीला अखिल भारतीय संत साहित्य संमेलन घेतलं. या संमेलनात बरे पारखून घ्या रे हाती हा सूर घुमला. १६ फेब्रुवारीला संमेलनाच्या उदघाटन समारंभापूर्वी दिंडी सोहळा आयोजित केला होता. नवी मुंबईतल्या नेरुळमधील गजानन महाराज मंदिर ते संमेलन स्थळापर्यंत दिंडीचा प्रवास झाला. टाळ - मृदंगाचा गजर व भजनाच्या नाद, सुराने परिसरातील नागरिकांना संमेलनाचं  भान आलं असेल . हजारो विद्यार्थी वारकर्यांच्या वेशात सहभागी झाले. नागरिकही मोठ्या संख्येने होते. लक्षवेधक अशी हि दिंडी संमेलनस्थळी आली, तेव्हा संमेलनाचे उदघाटक केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार वेळेवर उपस्थित होते आणि त्यानंतर रंगला उदघाटन सोहळा… भव्य मंच, हायटेक व्यवस्था हे वैशिष्टय दिसत होतं. संमेलनावर वारकरी साहित्य परिषद आणि वारकरी सेना यांच्यातल्या वादाचं सावट होतं. शरद पवार संमेलनाच्या मंचावर जाण्यापूर्वी डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांना याची कल्पना दिली होती. याबाबत चित्रलेखाशी बोलताना सदानंद मोरे म्हणाले, 'वारकऱ्यांत तीन गट आहेत. पहिला गट  आहे हिंदुत्ववाद्यांचा. त्याला विश्व हिंदू परिषद आणि रा.स्व. संघ परिवार संघटीत करतोय. दुसरा गट आमच्यासारखा पुरोगाम्यांचा आहे. वारकरी साहित्य परिषदेचे उपक्रम त्या गटाकडून सुरु आहेत. तिसरा गट  आहे - गोंधळलेल्यांचा ! त्यांना बरे ते पारखून घ्या रे हाती अशी आमची विनंती आहे.'

अपेक्षेप्रमाणे उदघाटनाच्या भाषणात शरद पवार म्हणाले, 'वारकरी संप्रदाय समाज एकसंध ठेवण्याचं काम करतोय. संतांचं साहित्य जतन व्हायला हवं. संतांची शिकवण समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावी. वारकर्यांनी गट-तट संपवावेत. ते समाजाच्या हिताचं नाही. गट-तट संपले नाहीत, तर समाजाच्या वादिल्कीची भूमिका बजावणाऱ्या वारकरी संप्रदायाला समाजालाच उत्तर द्यावं  लागेल. 

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले 
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा 
मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त 
ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी 
दया करणे जे पुत्रासी, तेचि दासा आणि दासी 
तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंताची मूर्ती -

या अभंगाची आठवण करून देत शरद पवारांनी आवाहन केलं, 'मराठवाडा, पशिम महाराष्ट्रात मोठा दुष्काळ आहे. अन्नधान्य आहे, पण पाणी नाही.  म्हणून दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुढे या. पाण्याचा वापर जपून करा. मदतीचा हात देण्यासाठी घराघरांतून सुरुवात करा. वारकरी संप्रदायाने या दुष्काळावर मात करायला समाजाला प्रोत्साहित करावं. पारायणातून प्रबोधन करण्याची मोठी जबाबदारी वारकरी संप्रदायावर आहे. पारायणात मोठी शक्ती आहे. संतांची शिकवण आचरणात आणल्यास समाज घडण्यास मदत होईल.'

संतसाहित्याने स्त्रियांची कोंडी फोडली. जनाई, मुक्ताई, सोयरा, निर्मळा, यांच्यापासून ते बहिणाबाई सिऊरकरांपर्यंतच्या कवयित्रींची समृद्ध परंपरा संत साहित्याने निर्माण केली. मुक्ताबाईंचं गुरत्व चांगदेवांनी आणि बहिणाबाईंचं गुरत्व दीनकवी या पुरुषांनी स्वीकारलं होतं. स्त्रीजन्म म्हणोनी न व्हावे उदास, मज केले ऐसे साधुसंते हा दिलासा संतांनी स्त्रियांना दिला. त्याकडे बोट दाखवत शरद पवार म्हणाले, 'संत साहित्य व वारकरी संप्रदायाने लिंगभेद, जातीभेद, धर्मभेदाला फाटा दिला. मानवता शिकवली. पण स्त्रियांना अद्यापि पारायणाचा अधिकार नाही. हे कितपत योग्य आहे ? महिलांना बाजूला ठेवून देशाचा विकास कसा होणार ? समाज परिवर्तानात सर्वांचा हात लागला पाहिजे.' म्शारद पवार हे बोलत होते, तेव्हा मंचावरही महिलांची उपस्तिथी नव्हती. हि उलटी खूण म्हणावी का ?

उदघाटन समारंभात भाषण करताना डॉ. सदानंद मोरे यांनी एका कळीच्या मुद्याला हात घातला. तो मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचा होता.  


अर्भकाचे साठी, पंते हाती धरिली पाटी 
तैसे संत जगी, क्रिया करुनी दाविती अंगी 

लोकांनी कसं  वागावं हे त्यांना शिकवताना संत स्वतः तशी क्रिया करून दाखवतात. अर्थात, संतांचं हे लोकशिक्षकाचं रूपच म्हणायचं. याची जाणीव करून देत डॉ. सदानंद मोरे म्हणाले, 'संत साहित्य हा मराठी साहित्याचा मुख्यप्रवाह आहे. पण यातले विचार योग्य प्रकारे मांडले नाहीत. संतांचे विचार नीटपणे समाजासमोर ठेवले असते, तर कदाचित डॉ. बाबासाहेबांना धर्मांतर करावं  लागलं नसतं. मराठी समाज स्वाभिमानी असायला हवा. संत साहित्याचा  खजिना आपल्याकडे आहे. ते साहित्य माणसाला जगायचं कसं याची शिकवण देतं. अशा जगण्यातूनच संत साहित्याची निर्मिती झाली आहे. १९३० च्या दरम्यान बाबासाहेबांच्या मनात धर्मांतराचे विचार घोंघावू लागले होते. त्यावेळी वारकरी संप्रदायाने नीट पावलं टाकली असती, तर बाबासाहेबांना धर्मांतराचं पाऊल उचलावं लागलं नसतं, एवढी ताकद संत साहित्यात आहे.'

डॉ. सदानंद मोरे म्हणतात ते खरं आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर करताना हिंदू धर्माचा अंगभूत भाग बनलेल्या जाती व्यवस्थेवर प्रहार केला. त्यावेळी त्यांनी संतांनाही झोडपून काढलं. पण त्याच बाबासाहेबांवर संत साहित्याचा प्रभावही होता. त्यांच्या मूक नायक आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांवरील ब्रीदवाक्य अनुक्रमे तुकोबा आणि ज्ञानोबांचीच होती. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतरही आपल्या अनुयायींनी संत नामदेवांच्या -

देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो-

या धर्तीवर बुद्धपदी दृढ भावो अशा गाठ लिहाव्यात, अशी अपेक्षा बाबासाहेब व्यक्त करतात. 

उदघाटन समारंभात मंचावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, संमेलनाध्यक्ष डॉ. अभय टिळक, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार किसन कथोरे, आमदार नरेंद्र पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील होते.

मंचावर सदानंद मोरे आणि अभय टिळक हे वारकर्यांच्या पेहरावात होते. टिळक यांनी तर फेटा घातला होता. संत तुकाराम यांचे वंशज असलेले सदानंद मोरे प्राध्यापक व संतसाहित्य अभ्यासक आहेत; तर अभय टिळक अर्थविषयतज्ञ आहेत. अध्यक्षीय भाषण करण्यासाठी टिळक कीर्तनकारासारखे उभे राहिले. 

आजिचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संतजन मायबापी 
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, श्रुन्गारीके बाळ कवतुके 

या अभंगाची उजळणी करून देत अभय टिळक म्हणाले, 'संतांनी शिकवलेल्या मुल्यांचा तराजू हातात धरून जीवन जगलं  पाहिजे. पूर्वी समाजात धार्मिक आणि सामाजिक विषमता होती, आताही अशी विषमता आहेच, पण त्याजोडीला आर्थिक विषमत वाढली आहे. ती दूर करण्यासाठी संत विचार आचरणात आणायला हवे. तरच समाज एकसंध राहील. माणसाची बुद्धी व्यापक व्हावी, निष्कलंक व्हावी, यासाठी प्रत्येकाने समता, शांती, प्रेम, बंधुता याविषयी विचारमंथन करावं, हाच संतसाहित्या संमेलनाचा हेतू आहे. संत साहित्याचे अभ्यासक, प्रसारक, साधक, सांप्रदायिक, संशोधक, संत विचारप्रेमी अशा सगळ्यांना एका विचारपिठावर आणून संतबोधाचं आपलं  आकलन अधिक प्रगल्भ आणि समृद्ध व्हावं, हा संमेलनाचा हरतु आहे.'

बरवे दुकानी बैसावे, श्रावण मनन करावे 
सर असाराची पोटी, ग्राहक पाहोनी कर रिती 
उगे चि फुगवू नका गाल, पूर्ण साठवावा माल 
सत्य तराजू पै धारा, नका कृत्रिम विकारा-

म्हणजे आजही संत विचार किती उपयोगी आहेत, ते व्यवहार कसा शिकवतात, याचा भरभक्कम पुरावाच आहे,' असं सांगत डॉ. अभय टिळक म्हणाले, 'आपल्या रोजच्या जीवनात संत विचार अक्षरशः अंक अंगांनी भिडलेला आहे. त्या विचारातून निर्माण झालेली मूल्यं आपल्या रोजच्या भाषेतून सतत आपल्या ओठांवर खेळतात. 

- शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी 
- नाही निर्मळ जीवन, काय करील साबण 
- दुर्बुद्धी ते मन, कदा नुपजो नारायणा,
- सुखाचे व्यवहारी सुख लाभ जाला 
  आनंद कोंदला मग पुढे 
- शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख 
- जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, 
  देह कष्टविती परउपकारे 
- ज्या ऐहिक धड नाही, त्यांचे परत्र पुससी काई 
- तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे 
- अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक 
- सर्वात्मकपण माझे हिरोनि नेतो कोण ? - हे केवळ वानगीदाखल उदाहरणं पाहा. या संमेलनात आपले रोजचे व्यवहार, समाजकारण, अर्थकारण, शेती व उद्योग, अभ्यासक्रम यासारख्या जीवनाच्या अन्य अंगणात संत मूल्यं कशी व कुठं पाझरलीत, झिरपलीत याचा धांडोळा होईल.'

अभय टिळक म्हणाले तसं तुम्ही आम्ही खेळीमेळी या भावनेने तीन दिवस विविध विषयांवरचे परिसंवाद रंगले. कीर्तन या शब्दाची फोड म्हणजे कीर्तीचं गान. संतविचार, संतबोध आणि संतप्रणित जीवनमूल्य यांचा जागर आणि कीर्ती-गान या संमेलनात झालं. हा सगळा महोत्सव म्हणजे एकप्रकारचा कीर्तन महोत्सवच ठरला. त्यात वारकरी होते, फडकरी होते, दिंडीकरी होते. मठाधीश, महंत, वाचक, अभ्यासक, संशोधक होते. 

उद्घाटनानंतर संत साहित्य आणि शेती या विषयावर चर्चासत्र झालं. त्यात बद्रीनाथ महाराज तनपुरे, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार पाश पटेल, पत्रकार निशिकांत भालेराव यांनी विचार मांडले. 

राम राज्य राम प्रजा लोकपाळ, एकचि सकळ दुजे नाही 
मंगळा वाचोनि उमटेना वाणी, अखंडचि खाणी एक रस 
अवघे जन मज झाले लोकपाळ , सोयरे सकळ प्राणसखे -

लोकशाहीत राजा आणि प्रजा समान पातळीवर असतात. तुकोबांची रामराज्याची कल्पना अशीच होती. आजचे राज्यकर्ते ती विसरले म्हणून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हे सूत्र रुजलं म्हणून सहकार चळवळ फोफावली. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हे विचार शेतकरी समाज प्रत्यक्षात जगाला म्हणून तो टिकला. संतांनीच वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, असा पर्यावरणाचा पुरस्कार शेतकऱ्यांना शिकवला. 

बळबुद्धी वेचोनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती- हा संतविचार राज्यकर्ते विसरले आणि आज पाण्याचा दुष्काळ पडलाय. 
शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी या वचनात शेतीचं सार आहे. बीज आणि पाणी म्हणजे शेती. त्या शेतीवर आज नष्टचर्य का ओढवलं ? याविषयी ऊहापोह करताना चर्चासत्रात बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले, 'भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकरी त्याचा आत्मा आहे. शेतकऱ्याला भिकेचं दान नको, त्याच्या मालाला योग्य दाम द्या. शेतकरी कच्चा माल तयार करतो. त्यात भेसळ करत नाही. भेसळ करणार्यांना मोबदला जास्त मिळतो. शेतकरयांना मोबदला कमी मिळतो. शेतीची परवड, शेतकऱ्याचं दुःख थांबलं पाहिजे, यासाठी वारकरी संमप्रदायाने कंबर कासावी.'

शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला व प्रत्यक्ष बाजारभाव यामध्ये मोठी तफावत आहे. याविषयी विवेचन करताना वामनराव चटप म्हणाले, 'स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत एका दाण्याचे शंभर दाने करणारा शेतकरी आत्महत्या करू लागलाय. संतांनी समाज घडवला. सध्या देशात उलटी व्यवस्था काम करते आहे. शेतकऱ्यांना दाबून ठेवलं जातंय; तर सरकार जनतेची लूट करत आहे.'

पाशा पटेल यांनी त्यांच्या ग्रामीण शैलीत घणाघाती भाषण केलं. ते म्हणाले, ' शेतीचं अर्थशास्त्र हे अत्यंत प्रामाणिकपणे लिहिण्याचं  काम राष्ट्रीय संतांनी केलंय. सरकारने शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. नाहीतर पिळला जाणारा शेतकरी आज आत्महत्या करतोय. उद्या तो राज्यकर्त्यांविरुद्ध उभा ठाकेल.'

त्यानंतरचा परिसंवाद संत साहित्य आणि उद्योग हा होता. त्यात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उद्योगपती अशोक खाडे, किशोर धारिया हे सहभागी झाले. 

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी-

हा तुकोबांचा अभंग मला प्रेरणा देतो असं सांगून दर्डा म्हणाले, 'भगवान बुद्धांनी सम्यक उपजीविकेचं सूत्र मांडलं. दुसऱ्याच्या उपजीविकेची मोडतोड न करता आपली उपजीविका करावी, असं  ते सूत्र सांगतं. माणसाने व्यवसाय करावा, पण गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, असं  महावीरांनी सांगितलं. महात्मा गांधींनीही तेच सांगितलं . पण हे सगळे विचार आपल्या संतांच्या साहित्यात सापडतात. स्वतःची गरज सारून जी संपत्ती उरते, त्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून आपण वावरायचं. या विचारातूनच मोठे उद्यागपति घडले. त्यांच्या हातून समाजोपयोगी प्रकल्प उभे राहिले.' अशोक खडे यांनीही यावेळी मी वारकरी असल्यानेच यशस्वी उद्योगपती होऊ शकलो, असं  मत मांडलं. 

शेती आणि उद्योग यावरचे परिसंवाद सुरु असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची तीनशे मुलं संमेलन मंडपात भाषणं लक्ष देऊन ऐकत होती. दुष्काळ आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या करू नये, असं  दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असंच जणू ही मुलं  इतरांना सांगत होती. ही मुलं नाशिकच्या आधारतीर्थ आधाराश्रमात राहून शिक्षण घेत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी या मुलांचा सांभाळ करीत आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला झालेल्या संतसाहित्य आणि पाठ्यक्रम हा परिसंवाद लक्षवेधक ठरला. त्यात विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके, प्राचार्य दिलीप धोंडगे, महसूल विभागाचे उपसचिव माणिक गुट्टे, रंगनाथ नाईकडे यांनी भाग घेतला. 
आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने, शस्त्रे करू. 
शब्दची आमुच्या, जीवाचे जीवन, शब्द वाटू, धन जनलोका 
तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव, शब्देची गौरव, पूजा करू - 

'हा तुकोबांचा अभंग मला प्रेरणा देतो म्हणून माझ्यासारख्या आदिवासी समाजातला एक मनुष्य प्राध्यापक झाला. पुढे शिक्षणमंत्री व्हायला बळ मिळालं आणि आता उपसभापती आहे,' असं  वसंत पुरके बोलले, तेव्हा सभागृह भारावून गेलं होतं. 'संत बोलीभाषेत बोलले. त्यामुळे त्यांचं शब्दधन शेकडो वर्षं मनामनांत रुंजी घालतंय. संत्विचार पाठ्यक्रम, अभ्यासक्रमात असले पाहिजे. ते शिकवायला चांगले शिक्षकही निर्माण झाले पाहिजेत,' असं  सर्वच वक्त्यांनी बोलून दाखवलं. 

१८ फेब्रुवारीला तिसऱ्या दिवशी संमेलनाचा समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रम पत्रिकेत बांधकाममंत्री छगन भुजबळ, विनोद तावडे, गणेश नाईक, भाई जगताप यांची नावं होती, पण ते आले नाहीत. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकमेव वक्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी वारकरी साहित्य परिषदेने राज्यामध्ये सर्व धर्मांच्या धर्मस्थळांच्या सुव्यवस्थेसाठी, संवर्धनासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र देवस्थान मंत्रालय निर्माण करावं, असा ठराव केला. आळंदी, देहू, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांसाठी शहर विकास अराखड्यापेक्षा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करावा, राज्यातल्या सर्व विद्यापीठांत संत अध्यासनं सुरु करावीत, त्यातून संतसाहित्याचा प्रचार व्हावा, संतसाहित्या संमेलनाला २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी शासनाने द्यावा, इंद्रायणी, भीमा, नीरा, गोदावरी, तापी या नद्यांचं शुद्धीकरण करावं, हे महत्वाचे ठरावही केले. 

निम्न भरलिया उणे, पाणी ढळोची नेणे 
तेवी श्रांता तौषौनी जाणे, सामोरेया 

'पाणी वाहतं. तेव्हा पाण्याच्या प्रवाहाला शेजारी खड्डा दिसला, तर ते आपला मार्ग सोडून प्रथम खड्डा भरतं. मगच पुढे जातं. अभावग्रस्ततेची पुरती करतं मग पुढे सरकतं. पाण्याच्या या गुणधर्माप्रमाणे आपल्या जगण्याची रीत असावी. दुसऱ्याचं दुःख दूर करून त्याच्या ओंजळीत संतोषाचं दान घालूनच पुढे गेलं पाहिजे. हा संतविचार मला आज मोलाचा वाटतो,' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. जात आता टाकाऊ झालीय ती टाका, असं  आवाहनही त्यांनी केलं. भ्रष्टाचार निर्मूलनावर उपाय सुचवताना ते म्हणाले, 'कायदे करून भ्रष्टाचार संपणार नाही. भ्रष्ट राजकारणी आपल्यातलेच आहेत. त्यांनी आपण लोकसेवक आहोत, हा संतांचा विचार आचरणात आणला, तर भ्रष्टाचाराला आळा बसेल.'

तीन दिवसांचा हा उत्सव संतविचारांची कीर्ती-गान करणारा ठरला. वारकरी संप्रदायातले पुरोगामी प्रवाह इथे दिसले. देहूकर फडाचे बापूसाहेब देहूकर, आजरेकर फडाचे तुकाराम काळेमाऊली, तनपुरे महाराज, डॉ. रामकृष्ण लहळीतकर अशी वारकरी संप्रदायातली मोठी मंडळी या संमेलनात होती. वारकरी संप्रदाय कर्मठ विचारांच्या आहारी जातोय, अशी टीका होत असते. इथं कुणी कर्मठ नव्हते, सुधारणावादी होते. हा पुरोगामी प्रवाह वाढला तर वारकरी संप्रदाय शाहू, फुले, आंबेडकरांच्या वाटेने जाईल, तो जावा याचसाठी आमचा अट्टाहास आहे, असं  सदानंद मोरे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होते. या आत्मविश्वासाचं वर्तमान होण्यासाठी झटलं पाहिजे, सनातन्यांशी झगडलं पाहिजे. अज्ञानाची काजळी दूर केल्याशिवाय संतविचारांची दिवाळी होणार नाही. 

बोला, पुंडलिक वरदा 
हरी विठ्ठल 


- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com